Sunday, 24 July 2016

उंबरखिंड अभ्यास मोहीम २०१६ (लोणावळा – कुरवंडे – चावणी – उबरखिंड – खोपोली)



उंबरखिंड अभ्यास मोहीम २०१६ (लोणावळा – उंबरखिंड – खोपोली)  


कोणत्याही नवीन मोहिमेची सुरवात हि अभ्यास मोहिमेतून करणे अनिवार्य असते . याच अनुषगाने उबरखिंड मोहीम साक्षात शिवराय ज्या मार्गांनी उबरखिंडीत दाखल झाले त्याच वाटेने करण्याचे योजले होते . त्यासाठी लोणावळा – कुरवंडे – चावणी – उबरखिंड – खोपोली ह्या मार्गाने मोहीम सुरु केली.  ठरल्याप्रमाणे दिनेश सावंत , अचल राणे , संतोष शेळके , विनोद भोसले , आणि योगेश वाळूंज असे आम्ही पाच जण या अभ्यास मोहिमे साठी प्रथमता जाणार होतो . त्यासाठी दिवस निवडला तो रविवार २४ जुलै २०१६. त्यासाठी आम्ही   शनिवार , २३ जुलै २०१६ रोजी सी.ए.टी  ते  पंढरपूर या पेसेंजर गाडीने लोणावळा पर्यंत चा प्रवास करणार होतो. सर्व नियोजन झाले होते, बैठक पार पडली होती . परतू संध्याकाळी त्यात अचानकपणे काही कारणाने ठरलेल्या मोहीम कार्यक्रमात बदल करून आम्ही सर्व रविवारच्या सकाळी ६:३३ च्या इंद्रायणी एस्प्रेस ने निघणार होतो.
               विनोद , संतोष , आणि मी (योगेश) आम्ही तिघेही अगदी वेळेवर ठरलेली गाडी पकडली. परंतु उर्वरित आमचे सख्खे दोन 
आधारस्तंभ म्हणजे दिनेश सावंत आणि आमच्या नेहमीच्या मोहिमेचे सरसेनापती अचल राणे यांचा काहीच पत्ता लागत नव्हता.
 दोघांना फोन करून करून आमच्या मोबाईल ची बॅटरी मात्र उतरली . पण एकाने मोबाईल बंद तर दुसर्याने तो बहुधा शांत मोड वर 
टाकून ठेवलेला असावा . असो ...  
आम्ही सारे एकमेकांचे सख्खे मित्रच , आमच्या तिघांचा हि मूड अचानक पणे आलेल्या या प्रसंगाने जाम उतरला होता. इंद्रायणी गाडी सोडून दिली . परतू काही केल्या या दोघांशी तिळमात्र हि संपर्क काही होऊ शकला नाही. आता करायचे काय? 
असा यक्ष प्रश्न आम्हां तिघांपुढे होता. सर्व नियोजित मोहिमेचा पुरता बोजबारा उडाला होता. आम्ही सर्वांचे आगाऊ तिकीट काढून ठेवले होते ते सुद्धा व्यर्थ गेले .काहीश्या गोंधळलेल्या आणि अचानक उद्भवलेल्या या 
परिस्थितीतून स्वतःला सावरत आम्ही कल्याण स्थानकात थोडी न्याहारी केली , आणि ओळखीच्या चेहऱ्यानसोबत थोड्या हसण्याचे
 क्षण अनुभवले . आमच्यातल्या विनोद ने मात्र आमच्या होणाऱ्या वाहिनीशी मनमोकळ्या गप्पा मात्र मारून घेतल्या. फसलेल्या नियोजनाचे अपडेट
सर्वांआधी “सबसे तेज” आमच्या वाहिनीन पर्यत पोहचत होते.   या सर्वातून उरलेले आम्ही दोघे २ तास मात्र ताटकळत राहिलो... 
असो!
पुढे काय करायचे ? कारण मिळणारी एक छानशी सुट्टी ची पुरती वाट लागलेली होतीच. अश्याच परिस्थितीत कार्ल्याच्या एकविरा 
आई , किवा भिवपुरी ला जाण्याच्या आम्ही विचार करू लागलो. सर्व काही ऑफ शेडूल होणार होते. असाच विचार करत करत 
आम्ही गर्दीने भरलेली आणि विकेंड ची मज्जा अनुभवण्यासाठी वा फिरण्यासाठी निघालेल्या मुंबई करांच्यासमवेत आम्ही हि 
कर्जत लोकल पकडली . त्याच गर्दीच्या लोकल मध्ये “दि शो मस्ट गो ओंन” या वाक्याला स्मरून उंबरखिंड ची ठरलेली मोहीमच 
“ऑफ शेडूल” करायची हे नक्की केले. कर्जत स्थानकातून आम्ही पुढे ९ वा. २०मि. ची इंदोर- पुणे या पूर्ण विनागर्दीच्या
गाडीने प्रवास करून लोणावळा स्थानकात १०वा. ११मि. दाखल झालो.  
 
      
लोणावळा स्थानकामधून बाहेर पडल्यानंतर बाहेर रिक्षा करून १५० रु . एवढा खर्च करून तिघांना कुरवंडे गावात जाता येते. चालत जायचे
असेल तर किमान ४५ मिनिटे ते १ तास लागतो. आम्हांला आधीच २ तास उशीर झाल्यामुळे १०वा. ४०मि. नी रिक्षाने प्रवास चालू केला.
रिक्षाने कुरवंडे गावात पोहचलो. तिथे थोडी चौकशी करून आम्ही कुरवंडे गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागच्या बाजूने 
नागफणीच्या च्या दिशेने चालण्यास सुरवात केली.






 सर्वजण चालण्याच्या उत्साहात होते. उजवीकडे चढत जाणारी वाट साधारण २० मिनिटे चाललो काही अंतर चालत गेल्यावर आम्हांला 
INS SHIVAJI च्या लांबलचक कुंपण दिसले. थोड्या पुढे गेल्यावर जेथे नागफणी चा डोंगर आहे. एकाशेजारी एक असणारे 
तीन फलक  पाहिले.  


इथून उजवीकडे वर जाणारा रस्ता नागफणीला जातो तर डावीकडे उतरणारा कच्चा रस्त्याने अम्बा नदीच्या काठी
 असलेल्या चावणी गावात जाता येते.  
 आम्ही चालण्यास सुरवात केली . खूप सारी नोंद घेत घेत ,छायाचित्रे काढत काढत आमची मोहीम पुढे सरकत होती. झरा लागल्यानंतर
 मात्र एक वाट सरळ जात होती तर एक वाट उजवीकडेवळत होती. थोडा विचार करून आम्ही  उजवीकडच्या वाटेवर शिक्कामोर्तब केले. 
सर्वांनी उजवीकडे मोर्चा वळवला. तेथून लांबवर दरीत अम्बा नदीचे पात्र दिसू लागले .



एका ठिकाणी थांबून आमच्या सोबत आणलेल्या न्याहारी चा मोकळ्या रान परिसरात आम्ही आस्वाद घेतला. खडकातून वाहणाऱ्या डोंगराळ पावसाच्या पाण्याने आमची तहान भागवत तृप्त होऊन आम्ही पुढे चालत होतो.  सोबत संतोष ने आणलेल्या वाळवलेल्या आंब्याच्या कोयींचे, जांभळाच्या बियांचे रोपण “योग्य ठिकाणी” करत होतो.









मजल दरमजल करत आणि सेल्फिं घेण्याचा  मर्यादित आनंद घेत आम्ही खाली उतरत होतो. साधारणता २:०० ते २:३० तासाचे अंतर आम्ही चालुन पायथ्याशी असलेल्या चावणी गावात पोहचलो. गाव तसे अगदी साधारण आहे . किमान २०० घरांची वस्ती असलेला ते एक छोटेसे गाव होते. त्या गावातून काही कच्चा आणि मग डांबरी रस्त्यातून चालत आम्ही “उंबरखिंडीत” दाखल झालो.












































समरभूमीत आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा महाराजांच्या पराक्रमाला स्मरून तिथे उभारलेल्या स्मारकाला वंदन करून आम्ही दुपारचे जेवण घेतले. थोडा वेळ पोहण्याचा आनंद आम्ही त्या ओढ्या च्या ठिकाणी घेतला. वेळेचा भान ठेऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला. उबरखिंड ते पाली-खोपोली रोड असे ४ किलोमीटर अंतर आम्ही पायी कापले. रोडवर आल्यावर ट्रक ने आम्ही काही अंतरावरील मुख्य चौकात उतरलो तेथून पाठून आलेल्या पाली-खोपोली एस.टी.  गाडीने आम्ही खोपोली गाठले .
मोहीम करताना सर्वांचा विचार, तसेच योग्य निर्णय घेण्याची असलेली नितांत गरज आणि आमच्यातील मोहीम सुरु असतानाची अबाधित एकत्र विचार शक्ती शेवटपर्यंत कायम ठेवायची असते. तिला कोणत्याही परिस्थितीत फाटे फुटू देता कामा नये. याची जाणीव करून देत , काहीश्या काळजीने आमची हि ऑफ शेडूल मोहीम मजेशीररित्या यशस्वीपणे संपन्न जाहली!  
  

मोहीम सूत्र - 

१. लोणावळा स्टेशन परिसरापासून मोहीम सुरवात  

२.  लोणावळा ते कुरवंडे गावापर्यंत प्रवासाचे नियोजन करावे .

. कुरवंडे गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाठच्या बाजूपासून नागफणीच्या च्या दिशेने चालण्यास सुरवात करावी.  

. च्या कुंपणाच्या बाजूने सरळ चालत जावे. 

. चावणी गावाच्या दिशेने खाली उतरण्यास सुरवात करावी. 

. चावणी गावातून पुढे उंबरखिंडित जाता येते. 

. परतीच्या प्रवासाच्या वेळी ४ किलोमीटर अंतर चालत पार करून शेमडी गावच्या ठिकाणी, पाली – खोपोली रोड पर्यत पोहोचणे.
८. तेथून एस. टी . बस ने किवां खाजगी वाहनाने खोपोली ला जाता येते . 



Sunday, 8 March 2015

शिवजन्म उत्सव ( शिव जयंती )

शिवजन्म ( साभार चंद्रशेखर पिलाने )
“राजा श्रीशिवछत्रपति” बोलताच एक उज्वल भविष्य मांडणारे हिंदूस्थान कर्तुत्ववान व्यक्तिमत्व, प्रचंड इच्छा शक्ति अन आपल्या मावळ्यांवर बंधू सारखे प्रेम करणारे “राजा श्रीशिवछत्रपति शिवराय”..........
अखंड हिंदूस्थान मध्ये १४६० च्या काळात हिंदूंवर होणारा अत्याचारामध्ये निजामशाही, मुघलशाही, कुत्बशाही, इमादशाही आणि बरीदशाही यांनी तर समस्त हिंदूंची इच्छापूर्ती संपुष्ठात आणली. श्री भगवान श्री कृष्णांनी सांगितलेले उद्गार
“जेव्हा जेव्हा या पवित्र पावन धर्तीवर अत्याचार, व्यभिचार, मानव अहितकार अश्या अनेक संकटाना व्याधीतून मुक्त करण्यासाठी एक परमात्मा या भूमीवर जन्म घेईल” आणि तो दिवस उजाडला १५५१ शुक्ल संवत्सर फाल्गुन शुद्ध तृतीया “राजा शिवछत्रपति” यांनी मातोश्री “जिजाऊसाहेब” यां स्वातंत्र्यदेवीच्या उदरात जन्म घेतला.लहानपणा पासून हिंदू धर्माची शिकवण शिवछत्रपतिंना जिजाऊसाहेब यांनी महाभारत, पुराण व इतर पवित्र ग्रंथ हि सारी शिवछत्रपतिंची अध्ययन केंद्र होती. भगवान श्री कृष्ण यांच्या राजनीतीचे रुपांतर शिवनीती मध्ये कसे मांडावे याचे शिकवण सुद्धा जिजाऊसाहेबां बरोबर श्रीमंत श्री शहाजी राजे यांनी सुद्धा दिली. पण जस जसा शिवकाळ व शंभूकाळ संपत आला आणि अखंड हिंदूस्थानाला उतरती कळा लागू लागली.....
ती म्हणजे पोर्तुगीज व इंग्रज ......
इंग्रज आले व्यापार केला व लालसे पोटी सत्ता उपभोगास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी संपूर्ण हिंदूस्थान पादांक्रांत करून आपली संस्कृती हिंदूस्थानच्या माथ्यावर मारण्याची सुरुवात केली आणि आपण मात्र ती उदार मनाने स्वीकारली. संपूर्ण हिंदूस्थानात सरकारी, नीम सरकारी, नागरी, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक कारभार हा इंग्रजी कालगणनेनुसार चालतो. या हिंदूस्थानातील दिनदर्शिका हि इंग्रजी कालगणनेनुसार तयार केल्या जातात. श्रीशिवछत्रपतिंची जयंती हि इंग्रजी कालगणनेनुसार १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी आली होती. सरकार व संबंधीत निरनिराळ्या अनुशासनालयें यांच्यात एक वाक्यता राखण्यासाठी १९ फेब्रुवारी या दिवशी श्रीशिवछत्रपतिंची जयंती उत्सव साजरा केला जातो. आणि तो शासकीय संमत सार्वजनिक सुट्टीचा दिवस असतो. पण त्या इंग्रजी कालगणनेत सुद्धा किती एक सूत्रता आहे का ? याचा विचार आपण कधी केला आहे का ? तो सुद्धा श्रीशिवछत्रपतिंच्या जयंती बद्दल यावर एकचं उत्तर नाही ......
इंग्रजी कालगणना आणि त्यामधील त्रुटींमुळे इसवी सन १५८२ साली पोप ग्रेगरी यांनी बाद केले व ४ ऑक्टोबर १५८२ नंतर पुढील दिवस १५ ऑक्टोबर १५८२ आहे असे समजावे असा फतवा काढला. अर्थात त्यातील त्यांनी त्या वर्षातील १० दिवस बाद केले. युरोपातील कॅथॉलिक देशांनी ताबडतोब नव्या ग्रेग्रोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला. परंतू जगभर साम्राज्य प्रस्थापित करणाऱ्या प्रोटेस्टंट ब्रिटनने मात्र २ सप्टेंबर १७५२ पर्यंत ग्रेग्रोरियन कॅलेंडरचा स्वीकार केला नाही. ब्रिटनच्या साम्राज्यात ज्युलियन कॅलेंडर प्रमाणेच कालगणना चालू राहिली. अर्थातच भारतातही सारा इतिहास हा ज्युलियन दिनांकात रुपांतर करण्यात आले. १७५२ साली २ सप्टेंबरच्या पुढील दिवस १४ सप्टेंबर असेल, असे घोषित ब्रिटनने ग्रेग्रोरियन कॅलेंडरशी जुळवून घेतले.(१)
अर्थातचं मग आपणचं का ज्युलियन कॅलेंडर प्रमाणेच कालगणनचे स्वीकार करून आपल्या हिंदूस्थानातील तिथी संस्कृतीला दुरावा का देतो ??????
आता आपण तिथी संस्कृती पाहू....... आपणांस माहितचं असेल कि इंग्रजी वर्ष म्हणजे “इ.स.” आणि भारतीय वर्ष शके (संवत्सर) यांच्यामध्ये ७८ वर्षांचा फरक आहे. ७८ वर्षे मिळवली तर इंग्रजी कालगणने नुसार आपल्याला इसवी सन मिळते ते उदा. ( शके (संवत्सर) १५५१+७८ = (इसवी सन) १६२९ ) आपणांस हि संख्या मिळते आणि इतर सर्व शिवकालीन इतिहासकारांनी अशी पद्धत स्वीकारलेली आहे हे आपणांस माहितचं असेल.....
आता आपण शिवकालीन इतिहास संकलक श्री. आप्पा परब यांनी मिळवलेली माहिती पाहू....
१) राजाभिषेक शकावली १६७४
२) शिवापूरवही शकावली १६७४
३) दासपंचायन शकावली १६९६
४) * जेधे शकावली १६९७ (अत्यंत महत्वपूर्ण माहिती)
या चार शकावली शिवजन्मतिथी नोंदताना “ शके (संवत्सर) १५५१“ ची नोंद करण्यास विसरत नाही. त्यातही जेधे शकावली विस्तृतपणे सांगते कि, शुक्ल संवत्सरे शके १५५१, फाल्गुन वद्य तृतीय, शुक्रवार, हस्त नक्षत्र, घटी १८, पळे ३१, गड ५, पळे ७ ये दिवसीं राजश्री शिवाजीराजे शिवनेरीस उपजले. (२)
त्याच सोबत कविश्वर परमानंदांनी पोलादपूर येथे “शिवभारत” या काव्यग्रंथात ६ व्या अध्यायांत २६, २७ व २८ श्लोकांत श्रीनृप शालिवाहन शके १५५१, शुक्लनाम संवत्सर, उत्तरायण, शिशिरऋतू मध्ये फाल्गुन वद्य तृतीय जन्म झाला अशी नोंद केलेली आहे. (३)
हिंदूस्थानातील दक्षिणेतील कर्नाटक मधील बृहदेश्वरमंदिर शिळालेख, उत्तरेतील राजस्थानातील शिवजन्मपत्रिका, पूर्वेकडील कारी (?) येथील शकावली, हिंदूस्थानातील पश्चिमेकडील शिवभारत काव्यग्रंथ या चारही संदर्भातून आई जिजाऊ यांच्या पोटी षष्ठम पुत्रजन्माचे लिखित प्रमाण मिळते. श्रीसातवाहन शके १५५१, शुक्ल संवत्सर, फाल्गुन वद्य तृतीय शुक्रवार ये दिवशी राजश्री शिवाजीराजे किल्ले शिवनेरीवर उपजले. (४)
श्रीनृप शालिवाहन १५५१, शुक्लनाम संवत्सर, उत्तरायण, फाल्गुन वद्य तृतीय, शिशिर ऋतू, सूर्यास्तानंतर जिजाबाई साहेब यांचे उदरी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला. त्या दिवशी इंग्रजी दिनांक होता १ मार्च १६३० (ज्युलियन दिनांक १९ फेब्रुवारी). (५)
भारतीय तीथ - फाल्गुन वद्य तृतीय, शुक्लनाम संवत्सर १५५१, जन्म स्थान : शिवनेरी, जन्म वेळ : सायंकाळी ७ वाजता, उदित रास : सिंह (६)
इसवी सन पूर्वी सातवाहनांनी आपले साम्राज्य या दंडकारण्यात निर्माण केले. त्यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण या अतिप्राचीन शहराची कीर्ती दूरदूर पर्यंत दिगंत पसरवली. सातवाहनांपासून पुढे तेराव्या शतकापर्यंत महान अश्या राष्ट्राची संस्कृती चहू बाजूंनी बहरवली आणि फुलवली सुद्धा हे मोठे अग्रस्थानी मांडिले पाहिजे.
सातवाहनानंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, कलचुरी, शिलाहार व यादव अश्या राजकुळांनी महाराष्ट्राला प्रगती पथावर अग्रेसर केले. आज आपण त्याचं हिंदूस्थानातील तिथी संस्कृतीला दुरावा देत आहोत हे सत्य आहे कि नाही. ??? आपण इंग्रजी कालगणना फक्त सरकारी व इतर आर्थिक व्यवहारात योजिले तर काही गैर नाही परंतु आपल्या पुढील पिढीला मात्र हिंदूस्थानातील तिथी संस्कृती विषयी तरी योग्य ते मार्गदर्शन केलेचं पाहिजे.
हीच एक विनंती .....
|| जय भवानी – जय जिजाऊ ||
|| जय श्री शिवछत्रपतिं ||
- संदर्भ
अ) शिवजन्म : (२), (३) पृष्ठ क्रमांक. ९ व १०, (४) पृष्ठ क्रमांक. ५ (शिवकालीन इतिहास संकलक श्री.आप्पा परब)
ब) खगोलीय शिवकाल (१) पृष्ठ क्रमांक. ५, (५),(६) पृष्ठ क्रमांक. ९ व १० (मोहन आपटे, पराग महाजनी)
( छायाचित्र साभार : महाजाल )
—© वरील सर्व हक्क संदर्भ लेखकांकडे आहेत.